मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Thursday, September 24, 2009

4/ मृत्युंजयी सावित्री आणि रुपकुंवरचे सती जाणे

मृत्युंजयी सावित्री आणि रुपकुंवरचे सती जाणे

शेवटी एकदा रुपकुंवर सती केसचा निकाल लागला. (की निक्काSल लागला?) आणि न्यायालयाने निवाडा दिला की यांत कोणीही दोषी नाही- कुणीही तिची हत्या केली नाही. ती आपण होऊन सती गेली | ती किती उदात्त ठरली |
ती सती गेली अगर घालवली, पण जाता जाता देशातल्या बुरसटलेल्या विचारसरणीवर बुरशीचा आणखीन एक जाड-जूड थर पसरवून गेली | रुढीवादितेत भर टाकून गेली | स्त्रीच्या अबला पणाचे हे उदाहरण पाहून जेवढया लोकांच्या मनात आक्रोश उठला असेल त्यापेक्षा कित्येक पट जास्त लोकांना कित्येक पट तीव्रतेने अस वाटल की हाच नारी जीवनाचा आदर्श आहे आणी जिने हा आदर्श घालूनप दिला ती देवी झाली |
या घटनेच्या जमाम बातम्या वाचत असतांना जेवढी हळहळ मला रुपकुंवर आणी आपल्या समजाबद्दल वाटली तेवढीच हळहळ वाटली एका पुराणकालीन महिलेबद्दल. कारण या सर्व प्रकरणांत तिच्यावर अन्याय होत आहे - तिची प्रतिमा डागाळत आहे, तिच्यावर कलंक फासला जात आहे | ती दिव्य स्त्री आहे सावित्री | आपल्या समाजाची अधोगति यापेक्षा जास्त कांय असू शकते की एरवी जी नारी शौर्याच प्रतीक आहे, चंडीपेक्षाही उग्र आणी उत्कट आहे, जेता आहे, मृत्युंंजयी आहे तिच्या नांवाचे दाखले देत देत, तिची माळ जपत-जपत, दुस-या एखाद्या स्त्रीला मूक, दुबळयश-भित्र्या बलिदानाला भाग पाडल जातय |
बालपणापासूनच सावित्री या व्यक्तिमत्वाने माझ्या स्वप्नदर्शी मनाचा पगडा घेतला होता. किशारोवस्थेत तर तीच माझी आदर्श झाली होती. तिच्या जीवनकहाणीतील कितीतरी आव्हानांनी माझ्या मनाला भुरळ घातली होती. ती एका विस्तीर्ण साम्राज्याची राज्यकन्या व एकुलती एक वारस होती | घोडेस्वारी, युध्दकला, शस्त्रप्रयोग आणी रथ संचालनालत ती अत्यंत निपुण होती. वडिलीांबरोबर युध्दाच्या आघाडीवर जात होती | त्याही काळात स्वयंवरे होत असत आणी स्त्रीला स्वत:चा पति निवडायचा अधिकार होता. पण एवढयावर सावित्री संतुष्ट नव्हती. स्वयंवराला येणारे फक्त तिच्याशी लग्नाला इच्छुक असणारे पुरुष येणार | पण ती त्यांच्याशी लग्नाला इच्छुक असेलच अस कुठे आहे ? तेंव्हा ही स्वत:च वरसंशोधनाच्या मोहिमेला निघाली | निवड केली सत्यवानाची जो त्यावेळी अतिशिय दरिद्री व विपन्न अवस्थेत होता | त्याचे आई-वडिल वृध्द व दृष्टिने अधू होते | सत्यवानाच्या समोर त्यावेळी एकच ध्येय होत - आईवडिलांची सेवा करणे | इतर कुठल्याही कामासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता | अस असूनही सावित्रीने त्याच्यात नेमक कांय पाहिल असेल की त्यामुळे त्याला पती म्हणून निवडावा ? तिला कांय आत्मबलिदानाच उदाहरण घालून द्यायच होत ? का लोकर्झ््रिंळ्ना दाखवूुन द्यायच होत की स्त्रीने कर्ुिंझ््रळ् खाली मान घाजलून, आपले अश्रु मनांत कोंडून ळठेवून दारिद्रृयात जीवन कंठाव ? मुळीच नाही. तर मूभ् कथेत असा उल्लख्ेख आहे कि सत्यवानाची निवड करतांना सावित्रीने त्याच शील पाहिल ज्ञ् त्याच सत्यवादितेच, खरेपणाच व्रत पाहिल आअणी पूर्वकाळातील त्याच्या शौर्याच्या आख्यायिकाही विचारांत घेतल्या | त्याच धैर्य आणी कष्टाला न कंटाळण्याच सामर्थ्य पाहिल | या सर्व गुणांचा विचार करुन मगच तिने सत्यवान हा आपला पति म्हणून निवडला |
निवड करुन सावित्री घरी परतली आणी आपल्रे मनोगत पित्याला सांगितले तेंव्हा खळबळ माजली | सत्यवानाची दरिद्री अवस्था हे एक कारण होतच. पण मुख्य म्हणजे ज्योतिषांनी अस भाकित वर्तवल की त्यांच्या शास्त्रानुसार सत्यवानाच्या कुंडलीत एका वर्षाच्या आत दुर्निवार मृत्युयोग आहे |
आपल्या अंधश्रध्दा निर्मूलनवाल्न्यांनी अजून ही गोष्ट वाचलेली नाही | त्यांना माहीत नाही कि सावित्रीने त्या काळात त्या ज्योतिषी मंडळींना चॅलेंज केल होत. तिने विचारल - माझ्या कुंडलीत तुम्हाला वैधव्य किती प्रतिवियोगाचा योग दिसतो कां ? मग
झाल तर | मग मी याच्याशीच लग्न करणार | तुम्ही आपली बेरीज-वजाबाकी करीत बसा आणी ठरवा कुणाची कुंडली कशी प्रभावशाली ठरणार ते |
अशी सावित्री - एरवी दैनंदिन जीवनात आपल्या वडीलधा-यांचा आदर आणी मान ठेवणारी | पण गरज पडली तेंव्हा त्यांना चॅलेंज करु शकणारी | तिच्या चरित्रातला हा गुण पुढेही दिसून आलाच |
विवाहानंतर पित्याने सांगून पाहिले की तिची समस्त सासरमंडळी त्याच्याच राज्यांत, त्याच्याच घरी येऊन राहू शकतात. पण तेही सावित्रीने ऐकले नाही. जर सत्यवान रापुत्र असूनही कष्टमय जीवनाला घाबरत नसेल, जर त्याचा हाच गुण तिला भावला असेल, तर तो गुण टाकून देण्याचा आग्रही सत्यवानाला का करायचा ? त्यापेक्षा स्वत: तो गुण उचलायला कांय हरकत आहे ? ती राजमजलातून निघून जलंगलातील झोपडीत रहायला आली. मात्र इतर स्त्रियांप्रमाणे फक्त घरांत बसून राहिली नाही. सत्यवानाबरोबर जंगलात जाऊन काम करु लागली. त्याचे कष्ट दोघांनी वाटून घेतले. आणी मला खात्री आहे की त्या कामाच्या त्रासापेक्षा सहवासाचा आनंद हाच दोघांना जास्त वाटला असणार | आणी मग तो क्षण आला | सत्यवानाच्या देहातून आत्मा काढून नेण्यासाठी स्वत: यमराज आले | आपण सामान्य माणसं ; मृत्युच्या कल्पनेनेच घाबरुन गेलो असतो - डोळे मिटून घेतले असते. पण तिच्यात हिम्मत होती. मृत्युच्या मागे आपण होऊन चालत जायची | ते बलिदान नव्हत, सती जाण पण नव्हत | ते खुद्द यमराजावर पाळत ठेवण होत | स्वत: यमाने तिच्या निडरपणाची प्रशंसा केली आणी म्हटल की तू शूर आहेस, निडर आहेस, सत्यवादी आहे, म्हणून मला न भिता पाहू शकतेस आणी तुझ्याशी मी ----------- मला बाध्य करु शकतेस | आपल्या जगातल्या, कोणत्याहि धर्मग्रंथांत, इतिहासात निडरपणाच अस दुसरं एकच उदाहरण मला सापडत ते म्हणजे नचिकेत याच. ज्याने यमराजाला गुरु बनवून त्याच्याकडून सत्यधर्म काय ते शिकून घेतल | पण सावित्रीच्या बाबतीत तर यमराज हा शत्रूपक्ष होता
आणि हे उदाहरण फक्त निडरपणाचच नाही आशंकेच्या त्या वातावरणांत पण सावित्रीचे मनं स्थिर होत आणी बुध्दि जागरुक होती. इथे तिच युध्दकौशल्य उपयोगाच नव्हत | तिच्या बुध्दिचातुर्याचा मुकाबला होता - एका आकाशदेवते बरोबर | आपली जागरुक बुध्दि, विनम्रपणांतून यमराजाला गाफील करण आणी अखेरपर्यन्त टिकवून ठेवलेली चिकाटी आणी तर्कशुध्दता या बळावर तिने यमराजाला पराभूत केला. यम सावित्री संवाद विवरण इथे मी सांगत नाही - कारण तो सर्वांना माहीत आहे. पण शेवटी यमराजाने सत्यावानाचा आत्मा त्याच्या देहात परत घातला. पुढे त्यांना सर्व ते-हेचे जय, यश ृ, समृध्दि, राज्य मिळत गेले ती कथा पण सर्वांना माहीत आहे.
पण त्या उपलब्धीच्या क्षणी सावित्रीचा आनंद कांय असणार ? मी खूपदा त्या विजयाची कल्पना करुन पाहिली | पण आपल्यापैकी कुणालाही अशा विजयाच्या जवळपास तरी जाता येईल कां ? ती विजयिनी, गर्वाने मान उंच करुन परतली असेल. पुढला सर्व लखलखीत भविष्यकाळ ओढून पदरांत बांधून आणल्याचा उल्हास तिच्या श्रीमुखावर झळाळला असेल | अशा गर्वोन्नत स्त्रीच्या नांवाने दुस-या स्त्रीला मान खाली घालून जगायला आणी मान खाली ठेवूनच मरायला आपण शिकवतो | जिने मृत्युला जिंकले तिचे नांव घेऊन आपण दुस-या स्त्रीला दुर्बळेपणाने मृत्यूचा स्वीकार करायला भाग पडतो | तोच आदर्श आहे अस तिला व स्वत:ला पटवायचा प्रयत्न करतो | सती या शब्दाचा अर्थ आहे - जिच्यात सत्य आहे, सत्व आहे आणि स्वत्व आहे अशी स्त्री | जिच्यात हे गुण असतील ती स्त्री मृत्युंजय होण्याची अधिकारिणी आहे. तेच विशेषण आपण लावतो. अशा स्त्रीला जिला समाजाने दाबून टाकल आणी जी प्रतिकार करु शकली नाही. विजयाचे असं म्हणतात की राजस्थानात प्रत्येक गांवात सती सावित्री मातेच मंदिर आहे. या मंदिरात जाणा-या प्रत्येक स्त्री पुरुषाने स्वत:वर ही अट घालून घेतली पाहिजे “मी मृत्यु विजयाची दृढता बाळगत असेन तरच मला या मंदिरांत प्रवेशाचा हक्क आहे | ”

Sunday, September 20, 2009

ठरवलेली पुस्तके व त्यांचे अनुक्रम

 ठरवलेली पुस्तके व त्यांचे अनुक्रम
चालती वाटा चालती पाऊले
हलधर सिंह
चंदर, आजोबा आणि गव्हाणे गुरुजी (डायरीतील पूर्ण इथे आलेले नाही)
हलब्या- पराशरन् नागपूर योजना
कथाबीज (चित्रप्रत)

आजही द्वारिका
             आजही द्वारिका 1, 2
अपर्णा 
श्यामा
हम भगीरथकी संतान
हमें औजार दो
घडीपत्रके 
          घडीपत्रकतालुका निरीक्षक भूमि अभिलेख यांना यावयास पाहिजे अशी प्रमुख कामे
अर्थशास्त्र  अनुक्रम



--------------------------------------------------------------------------------------------------------
समाज मनातील बिंब My essays on society and administration मराठी
1998 मार्चच्या सुमारास एकदा कराडवरून श्रीनिवास कुलकर्णी यांचा फोन आला --पाठोपाठ ते स्वतः येऊन भेटूनही गेले.माझे वृत्तपत्रांतील लेख त्यांना आवडत असत, व मी मौजच्या दिवाळी अंकासाठी लिहाव असं त्यांनी सुचवलं. त्यावेळी माझ्या मनांत एक कल्पना चालू होती की आपण नोकरीतले अनुभव-कथन यासारखे कांहीतरी लिहावे. कुलकर्णींना ही कल्पना आवडली. अशा रितीने मौजेच्या 1998 दिवाळी अंकासाठी एक लेख " माझी प्रांतसाहेबी" व थोड्या वेगळ्या धर्तीवर पुढील वर्षी "जमाबंदीची शतकपूर्ती" असे दोन लेख लिहून झाले. पुढे या टेम्पोमधे खंड पडला. इतर लेखन मात्र चालू होते. मग एकदा श्रीपुंना भेटायला गेले असता त्यांनी माझ्या लेखांचे संकलन प्रकाशित करण्याची तयारी बोलून दाखवली. लेखकाला यापेक्षा दुसरे कांय हवे? मग माझे निवडक लेख शोधून मौजकडे देणे, त्यावर प्रकाशकीय संस्कार होणे, मधे श्रीपुंच्या निधनामुळे ती प्रक्रिया लांबणीवर पडणे, असे होत होत अखेर हा संग्रह तयार झाला (15 जून 2010). त्या दरम्यान माझ्या इतर कांही लेखांचा संग्रह असलेले "इथे विचारांना वाव आहे" हे पुस्तक (लेखसंग्रह) देखील प्रकाशित झाल्यामुळे माझ्या वैचारिक मराठी पुस्तकांची संख्या दोनावर गेली. याच दरम्यान हिंदीतही माझे तीन लेखसंग्रह -- "जनता की राय", "है कोई वकील लोकतंत्रका!" आणि "मेरी प्रांतसाहबी" हे देखील छापले गेले. गंमत म्हणजे मराठी व हिंदी संग्रहातील किमान पन्नास टक्के लेख एकदम वेगवेगळे आहेत. आता इतर लेखांवर काम सुरू केले आहे. (मंद गती - पण आळसापुढे सध्या इलाज नाही.)
या संग्रहातील लेख --
माझी भूमिका
01 01शिक्षणाने आपल्याला काय द्यावे - दै.मटा १६.०४.९५ -- ब्लॉग वर
02 माझी प्रांतसाहेबी - मौज, दिवाळी १९९८
03 जमाबंदीची शतकपूर्ती - मौज, दिवाळी १९९९
04 04.भ्रष्टाचार, चौकशी, शिक्षा, न्याय इत्यादि - दै.मटा.१.६.९७ -- ब्लॉग वर
05 05. जा जरा चौकटी पलीकडे - दै.मटा 29.7.98 -- ब्लॉग वर
06 06 हिंदीला धोपटणे थांबवा - अंतर्नाद सप्टें. 2002 -- ब्लॉग वर
07 07.बेरोजगारीवर उत्तम उपाय - रेशीम उद्योग - दै.मटा.३०.१०.९० -- ब्लॉग वर
08 08.परस्परसंवाद आणि सामंजस्य महत्वाचे -- वर्तमान दिवाळी अंक 1986 -- ब्लॉग वर
09 09 चाकोरी बाहेरील आंबा - दै.सकाळ १०.०७.९६-- ब्लॉग वर
10 10.परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल हवा - दै.मटा १२.०१.९७ -- ब्लॉग वर
11. IAS मधील खळबळ at both - दै.गांवकरी मार्च 1996 -- not here yet
12. रोजगार हमी योजनेचे महाराष्ट्रातील स्थान- दै.सकाळ ४.२.८६-- not here yet
13 13. पाणी उपसल्याने काय झाले - दै.सकाळ 1984 -- ब्लॉग वर
14 14. नापसंतीच्या मतांचीही नोंद हवी - दै.सकाळ २५.२.९७ या ९८ ??-- ब्लॉग वर
---------------------------------------------------------------------------
त्या आधी प्रकाशित झालेला लेखसंग्रह इथे विचारांना वाव आहे --
Book published by Sanskriti Prakashan Phone no. 020-25521503, Pune July 2008
xx प्रस्तावना
1. शिक्षणाची फेररचना हवीच, पण तिचे केन्द्र हवे खेडे -- दै. सकाळ, कोल्हापूर, दि. 27-3-85
2. सत्ता आणि सुव्यवस्था -- दै. महाराष्ट्र टाईम्स, दि. 14-4-96
3. सेगणक पदनाम कोष -- दै. महाराष्ट्र टाईम्स, दि. 26-1-87
4. आरोग्यासाठी पाचच मिनिटे आपण काढतो कां? -- निसर्गशोभा, दिवाळी अंक, पुणे, 1992
5. ऐसा अंदमान -- दै. तरुण भारत, पुणे, 24-12-87
6.xx नैतिक मूल्यांना बैठकच नाही -- तरुण भारत, दिवाळी अंक, पुणे, 1987
7.xx कर्नाटकांतील रेशमी प्रयोग -- दै. महाराष्ट्र टाईम्स, दि. 11-2-87
8. प्लेगची भीती किती निरर्थक -- दै. महाराष्ट्र टाईम्स, दि. 6-10-94
9. नोकरशाहीतील संन्यासी -- दै. महाराष्ट्र टाईम्स, एप्रिल 95
10.हिम्मत पुरवली पाहिजे -- दै. गांवकरी, नाशिक, 27-11-94
11.शासकीय भूमिकेमुळे आयुर्वेदाची पीछेहाट -- दीर्घायु,दिवाळी अंक, पुणे, 1994 + सरकार दरबारी आयुर्वेदाचे दुखणे -- दै. गांवकरी, नाशिक, 30-7-95
12.तरुण विचारांचे वारे -- दै. गांवकरी, नाशिक, 26-3-95
13.xx उत्तर महाराष्ट्रातील तीव्र दुष्काळ -- दै. गांवकरी, नाशिक, ऑगस्ट 1995
14.xx पाणी नियोजनाचे आदर्श मॉडेल - पांझरा -- दै. महाराष्ट्र टाईम्स, दि. 15-10-95
15.xx म्हणे पक्षासाठी हवालाचा पैसा -- दै. सकाळ, पुणे, 10-2-96
16.आय्‌ ए एस अधिकार्‍यांमधील अस्वस्थता आणि अपेक्षा -- दै. लोकसत्ता, पुणे, 23-4-96
17.xx राजकारण आणि धर्माची फरकत अशक्य पण.... दै. महानगर, मुंबई, सप्टेंबर, 1995
18.त्रिशंकु लोकसभा, तशीच राहो -- दै. सकाळ, पुणे, 18-5-96
19.अर्धशतकी, कर्तबगारी स्त्रिया -- दै. महाराष्ट्र टाईम्स, दि. 11-8-96
20.xx शासकीय कार्यालयांतील संगणक प्रणाली -- दै. लोकसत्ता, पुणे, 4-7-96
21.xx प्रशासन लोकाभिमुख होण्यासाठी -- स्पर्धा परीक्षा, दिवाळी अंक, पुणे, 1996
22.xx मी कशी शिकले आणि शिकवले -- मैत्रीच्या पलीकडे, पुणे, 1997
23.xx वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी झाला तर -- संपूर्ण स्वास्थ्य, दिवाळी अंक, पुणे, 1996
24. कामाच्या एकत्र उठावासाठी -- सत्याग्रही विचारधारा, वर्षारंभ अंक, फेब्रु. 1998
25. भाप्रसेचा पुनर्विचार हवा -- अंतर्नाद दिवाळी अंक, पुणे 2002

----------------------------------------------------------------------------------
 तिसरा लेख संग्रह published by Sanskriti Prakashan Phone no. 020-25521503, Pune  २०११ ---

समाज
 माय मराठीत विज्ञान आणि कायदा - दै.सकाळ २.६.९६
नीती आणि दंड या माझ्याच विभूति आहेत - दै.सकाळ ११.२.९७
लोकशाही सिद्धांत आणि संशयात्मा - दै.सकाळ
काश्मीर आपल्या रक्तांत आहे का?
संस्कृती अशी घडते
तीन उत्साही पावले
आरोग्य
आरोग्य सेवा आणि आरोग्य शिक्षण
आयुर्वेदाला उत्तेजन देण्यासाठी दै.सकाळ - ०२.६.९६
तलासरी साथ आणि माझे प्रश्नचिन्ह - दै.गांवकरी १९९५
निसर्गोपचार
स्त्री विमर्ष
दक्ष महिला जिल्हाधिकारी यांची मुलाखत
आजचे स्त्री जीवन
तारा - लिंगभेदावर एक तीव्र प्रकाशझोत -
प्रशासकीय सेवा - स्त्रियांची संख्या आणि प्रभाव वाढत आहे
आजची धिटाई ही पुढील काळाची गरज
प्रशासन
दुष्काळाच्या तडाख्यांत सांगली जिल्हा
अभियांत्रिकी प्रवेश : एका पालकाचा सुखद अनुभव - दै.महानगर
जळगांव स्कँडलाच्या निमित्ताने - दै.मटा.५.९.९४
असे होते माझे पीए--- Published in Yashomanthan , the magazine of YASHADA, Pune
प्रशासनात संगणक CHECK-- HERE OR? - सा. विवेक, दिवाळी ९७
पोलिसिंग म्हणजे कांय?



























------------------------------------------------------------------------------------------

1. सांगलीचे दिवस --- अंतर्नाद, पुणे,
2.  'त्या' नागपूरी स्त्रियांच्या सोबतीसाठी म.टा. 21 Sep, 2004
3. मृत्युंजयी सावित्री आणि रुपकुंवरचे सती जाणे
4. ठावकीच नाही --- महाराष्ट्र टाईम्स दि.
5. कुसुमाग्रजाच्या कविता अनुवाद करताना --- आकाशवाणी पुणे
6. सुस्त दंड प्रक्रिया आणि तेलगी --- महाराष्ट्र टाइम्स दि. ----
7. युगांतर घडतांना -- लोकप्रभा 18.5.2007
8. प्रशासकीय लेखापरीक्षण एकांगीच राहिले --अंतर्नाद
9. सत्यवचनाचे वैज्ञानिक तथ्य -- मटा रविवार 8.6.2008 गेस्ट रूम सदराखाली प्रकाशित
10.संगणकावर  मराठी ब्लॉगच्या लेखनासाठी -- इनस्क्रिप्ट--- लोकमतसाठी 
11.त्याची शरम वाटते? -- मरीन ड्राइव्ह कांड -- मटा
12.मंत्री शोधतांना
13.सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे निकाल--अंतर्नाद
14.कौशल्य शिक्षणाशिवाय पर्याय नाही ----- लोकमतसाठी
15.मराठी बालसाहित्य कुठे आहे -- अंतर्नाद- JPG

कार्यक्षम व्यवस्थेसाठी --- मटा, दि 29 जून 2008. गेस्ट रूम सदराखाली प्रकाशित
पावले टाकतच रहायचे आहे-- मटा रविवार 15.6.2008
हक्कांची जपणूक आणि न्यायबुद्धी -- मटा रविवार 22.6.2008

बदलती जीवनशैली व कुटुंबपध्दती--- जळगांव सकाळ खास अंक दि.
बायोडीझेल काळाची गरज -- लोकराज्य जुलै 2006
आत्मसन्मान जपण्यासाठी -- मटा रविवार 8.3.2008

16.मिठाचे अर्थकारण --- अंतर्नाद .....
17.पावले टाकीतच रहायचं आहे --- मटा, दि 15 जून 2008. गेस्ट रूम सदराखाली प्रकाशित
18.हक्कांची जपणूक आणी न्यायबुद्धी --- मटा, दि 22 जून 2008. गेस्ट रूम सदराखाली प्रकाशित
19.बलात्काराला फांशीची शिक्षा हवीच --- केसरी दि.....
20.समाजकारण घसरलं भ्रष्ट अर्थकारण पसरलं -- शब्ददर्वळ दि. 2008
21.ही तर लक्ष्मीची पाउले
22. वादळाचा पाठलाग
२३. मन घडवणारे प्रसंग
सर्व ओझी निवारणासाठी - क्रिकेट --- लोकसत्ता, मुंबई दि.
योगत्रयी : आमुख ---
--------------------------------------------
मौज ने पाठवलेला हिशोब -दि 15-02-2016
2015-2016 मधील विक्रीपोटी --
17 कॉपी विकल्या -- उत्पन्न 17 * 160 =2720
रॉयल्टी ॅ10 % = 272 
हडफक बँकेत जमा केले -- दि. 15-02-2016 रोजी